एकांत आणि एकटेपणा

एकांत आणि एकटेपणा .

एकांत आणि एकटेपणा 🪶

एकांत आणि एकटेपणा … सगळ्यात आधी एकांत आणि एकटेपणा या दोन्ही मधला फरक लक्षात घ्या

एकांत हा निवडलेला असतो आणि एकटेपणा हा आलेला असतो , मग त्याची वेगवेगळी कारण असतात ,

एकांता मध्ये तुम्हाला स्वतःची ओळख होते तर एकटेपणा मध्ये तुम्ही स्वतापासून दूर जात असता …

एकटेपणा चा शेवट हा नेमहिचं दुखी असतो आणि एकांत माणसाला समजदार बनवतो तिथे माणूस जगायच शिकतो. माणूस हा समाजशील प्राणी आहे त्याला सतत लागत कुणीतरी आपल बोलण्यासाठी तुम्ही जास्त दिवस एकटे नाही राहू शकत मग त्यानंतर तुम्ही एकटेपणाला कंटाळलेले असता आणि जवळपास कुणी मिळत का बोलण्यासाठी याचा शोध घेता पण नाही दिसत कुणी-

तर अस का होत .. ??

थोड तुमच्या भूतकाळात बघा तुम्हाला कुणी जवळ करावं अस तुम्ही कधी वागलात का ?? तुमच्यावर कुणी प्रेम करावं अस काय आहे तुमच्याकडे .?? तुमच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असेल जी तुम्हाला गमावण्यापासून भीत असेल !! या गोष्टींकडे आपण कधी बघत नाही आपण काय पहातो; मी एवढा जीव लावला तरी ती व्यक्ती अशी वागली – अरे माझा विश्वास होता तो अस नाही करणार:

मग हेच रडगरान आपण आपल्या जवळच्या मानसांपाशी मांडायला सुरवात करतो बर नवीन कुणी मित्र झाला तरी हेच चालू आपल`

मग हाच क्रम आपल्या आयुष्यात सतत चालू राहिला तर आपल्या जवळची मानस आपल्याला नाही पण आपल्या त्या रटाळ स्वभावाला कंटाळून जातात आणि हळू हळू ते आपल्याला एग्नोर करायला लागतात…

एक लक्षात घ्या ;

जर तुमंच मन तुम्हाला सतत तुमच्या भूतकाळात घेऊन जात असेल तर तो एकटेपणा आहे आणि जर तुम्ही एकटे असताना तुमचं मन तुम्हाला भविष्यात होणाऱ्या गोष्टींचा आभास करून देत असेल आणि तिथे तुमचं मन तुमच्या सोबत आहे तुम्हाला साथ देत तर तो एकांत आहे -तुम्ही कधी एखाद्या जुन्या मित्राला कॉल करून बोलण्याचा प्रयत्न केलाय का ??  उगाच करा विनाकारण आणि त्याला विचारा कुठेयस  ? कसा आहेस ?? काय .. तो खूप छान बोलेल आणि लक्ष द्या तो त्याच्या सदय स्तिथीबद्दल बोलेल ना की त्याचा भूतकाळ तुम्हाला सांगत बसेल आणि बघा तुम्हालाही तो नाही विचारणार की तुमच्या आयुष्यात पूर्वी काय होत /? तो हेच विचारणार की आता कुठे आहेस ?? काय करतो आहेस ..?? अरे वा खूप छान !! बर अस कर तस कर माझीही काही मदत लागली तर सांग ..

हा असा संवाद असेल तुमच्या दोघांमधील तर “एकांत” अस काम करतो –

तर तुमच्या आयुष्यातील हा जुना मित्र दुसरा तिसरा कुणी नसून तुम्ही स्वतः आहात आणि तो मित्र तुम्हाला तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही स्वतः साठी थोडं थांबता एकांत घेता स्वतः बद्दल विचार करता !!

मी या परिस्तिथी मध्ये आता आहे: एकटा आहे आणि या अगोदर मी कसा होतो नेमकी ही स्तिथी माझ्या आयुष्यात का आली ?? माझ्या कोणत्या चुका झाल्या ..?? नेमकं मी कुठे चुकलो ..??

जिथे तुम्हीच तुमच्या आयुष्याला कंटाळलेले असाल तिथे कुणी तुमच्यावर प्रेम का करेल .. सोप्प आहे तुम्ही तरी रटाळ स्वभावाच्या माणसा सोबत आयुष्य घालायला तयार व्हाल का ?? नाही ना; मग अस काय करता येईल ज्यामुळे सगळे माझ्यावर प्रेम करतील माझ्याशी मैत्री करतील ते करा तुम्ही नका ना पडू एकटेपणा दूर करण्याच्या नादात तुमच्या स्वभावाच्या प्रेमात कुणी पडलं की होऊन जाईल एकटेपणा दूर ..

हे बघा प्रश्न आहे आणि उत्तर नाही अस कधी होत नाही~ शोधा म्हणजे सापडेल आणि सापडलं की आयुष्य ही स्थिर आणि पाऊस पडून गेल्या नंतर आभाळ कस शुभ्र होत त्या खाली मोकळा श्वास घेता येतो तस होईल ;

बघा एकदा प्रयत्न करून ..

 

हे सुद्धा वाचा. 🌿

 

आत्मविश्वास कसा वाढवायचा. 📌

पंजाबराव डख.  📌

जल प्रदूषण कारणे आणि परिणाम. 📌

 

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *