प्रेमपत्र - ६ 
मग कशी आहेस ..?
लाटांच किनाऱ्याशी कितीजरी घट्ट नात असलं तरी समुद्रात परत जावंच लागत ,समुद्र तीच सर्वस्व असत आणि किनारा फक्त मित्र ,मित्राला भेटून ती परत जाते फक्त एका कारणासाठी’ मैत्रीला डाग लागू नये म्हणून आणि माझ्या आयुष्यातील ती लाट कदाचित तू आहेस ,
आणि त्या किनाऱ्याला धडकणाऱ्या लाटे सारखी तुझी आठवण येतेय आज ,
खूप आठवण येतेय तुझी खूप ,.. कुठे आहेस ? कशी आहेस ,काय करतेयस ??
अशील ठीक माहीत आहे ,तशी तू खूप हुशारआहेस म्हणा ,
तर म्हणशील मला का तुझी आठवण येतेय ,
तर त्याच कारण अस की’- तुला तर माहीत आहे ना मी किती स्वार्थी आहे तर, जेव्हा अडचणीत असतो तेव्हाच तुझी आठवण येते ,
खूप आजारी आहे सद्या मी 2 महिन्या पासून ,झोपून नाही तसा पण आहे खूप आजारी …
म्हणून तर तुझी आठवण येतेय, तुला माहितेय एकदा मी लहान असताना ‘कदाचित 9 वि मध्ये असेल तेव्हा मी खूप आजारी पडलो होतो -कधी झोपतोय कधी उठतोय कधी जे1 करतोय काहीच कळत नव्हतं आणि तू मला बघायला यायचीस तेव्हा मी झोपलेला असायचो तू यायचीस जवळ बसायचीस डोक्याला बाम लावायचीस तुला काय वाटतंय मला कळत नव्हतं ते ? कळत होतं सगळं पण उठवत नव्हतं तेव्हा ,आणि झोपेत असलो तरी तू डोक्याला हात लावलास तरी तुज्या #स्पर्ष्याने ओळखायचो, हा हात तुझाच आहे आजूनही सगळं लक्ष्यात आहे तुला काय वाटत विसरलो मी ,तुझ्या सगळ्या आठवणी आजही पुनर्वित होऊन येतात…सगळं आठवत जश्यास तस,
तेव्हा जसा आजारी होतो तसाच आजारी आहे सद्या ,
,
7 वर्ष झाले तुला शेवटच बघून त्या नंतर ना तुझा आवाज ऐकलंय ना तुला पाहायला मिळालंय ,
तुज्या मनात खूप राग आहे न माझा,की मी प्रेम केलं नाही तुज्यावर ,कधी करणार सांग न जेव्हा कळत नव्हतं तेव्हा प्रेम शिकवलस आणि जेव्हा प्रेम कळायला लागलं तेव्हा हात सोडून निघून गेलीस ,कधी करणार ?
खर तर मी रागवायला पाहिजे तुज्यावर ….
आर्ध्यात साथ सोडलीस माझी ,किती एकटा पडलोय मी कळतंय का तुला ,
तुला माहीत आहे मला सद्या तुझी किती गरज आहे ते ,
कुणालाच नाही सांगितलं मी आजारी आहे म्हणून, घरी तर कितीतरी दिवसा पासून कॉल सुद्धा नाही ,आई ओळखते आवाजावरून मी कसा आहे म्हणून कॉल नाही केला,
तुला नाही माहीत ,
खूप गरज आहे मला तुझी खूप ,
दुसऱ्याना अडचणीत असताना प्रेम आठवत आणि मला माझी जिवलग मैत्रीण ,
_तू आठवतेस ,
माझ्या आयुष्यात तू आहेस म्हणून मी कुणाला पण सांगतो प्रेमा पेक्ष्या एक मनापासून काळजी करणारी #मैत्रीण बरी ,
तुला वाटत असेल मी तुला विसरलो पण खर सांगू ,
तू आठवली नशील असा दिवस गेला असेल तर “आई शप्पथ” …
अस नाही की दुसरं कुणी भेटलं नाही, भेटलं, पण’ मला काय म्हणायचय हेच जर त्यांना समजत नसेल आणि मला जे ऐकायचय हे जर ते बोलत नसतील तर मग असून नसल्या सारखच ,प्रेम करणारे ढिगाने आहेत माझ्या आयुष्यात पण त्या सगळ्यांमध्ये ही मी खूप एकटा अनुभवतो स्वतःला ,
कारण सोबत तू नाहीस ,
प्रेम करणार नकोय कुणी मला ,मला कुणीतरी समजून घेणार हवय , तुला तर न सांगता माझ्या मनातलं सगळं कळायचं म्हणूनच तुझी आणि त्यांची बरोबरी होत नाही आनि म्हणूनच तू माझ्या आठवणीत का असेना पण आजही तूच सगळ्यात जवळ आहेस …
खूप दिवसा पासून खूप एकटा राहायला लागलो आहे गरज नाही वाटत तशी कुणाची सोबत असावं म्हणून आणि आहेत न सोबत तूझ्या आठवणी मग आणखी काय बघायचं ,,,
खर सांगू तुझा नंबर आहे माझ्याकडे आणि खूप वेळा नकळत डायल पण होतो, पण रिंग जाण्या आगोदर कट करतो ,का करतो हे पण माहीत नाही आणि का कट करतो हे पण माहीत नाही ,
तुज्यावर कविता देखील सुचतात ,ओठावर येतात पण कागदावर उतरवता येत नाहीत ,का येत नाही माहीत नाही,
खूप राग आहे माझ्या मनात पण तुझा ,
बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तू न देता निघून गेलीस ,
आयुष्य कस जगायचं हे शिकवलंस पण एकटं कस राहायचं हे शिकवायचं विसरलीस , तेवढं शिकवलं असतस तर आज तुझी एवढी आठवण नसती आली,
बघ तू ,
तुला मी कधीच माफ नाही करणार….
तू माझ्या हृदयात राहणारी सगळ्यात जवळची “जिवलग” आहेस मग,मी एवढा अडचणीत आहे तुला का नाही दिसतंय ,आज मला तुझी खूप गरज आहे #please परत ये #please…..
मितवा ….❤️